खालील फोटोत माझ्या शेजारी बसलेला आहे , तो म्हणजे माझा जीवश्च कंठश्च मित्र अनंत देशमुख ! अनंत मधुकर देशमुख , नगर जिल्ह्यातल्या जामखेडचा !
" मेरी " (MERI , i.e Maharashtra Engineering Research Institute , Nashik.4.) मध्ये मी नोकरीला लागलो त्या वेळी मेरीच्या कॅंटीन मध्ये आमची ओळख झाली. मला रहायला भाड्याने खोली हवी होती , ती मला त्याने मिळवून दिली आणि अशा प्रकारे मेरी जवळच्या " तारवाला नगर " मध्ये आम्ही शेजारच्या शेजारच्या बंगल्यात सख्खे शेजारी झालो. तिथे जी आमची मैत्री जमली , ती आज तागायत तशीच घट्ट आहे. आमची लग्ने ही तीन आठवड्यांच्या अंतराने झाली. एकूण आमची फॅमिली फ्रेंडशिप झाली.
अनंताचा स्वभाव अतिशय दिलदार आहे. तो स्वतःचा विचार करण्या पूर्वी समोरच्याचा विचार करतो. अतिशय प्रामाणिक माणूस ! शासकीय नोकरीत प्रलोभनाचे प्रसंग कधी कधी येतातच ! पण असल्या गोष्टीकडे त्यांने निस्पृहपणे ढूंकूनही कधी पाहिले नाही. कामात एकदम चोख असल्याने आणि उत्तम बुध्दिमत्ता असल्याने तो उगीचच कुणा पुढे झुकण्याचा प्रश्नच नव्हता. ज्या अधिकारी वर्गाने त्याचे हे सदगुण जाणले त्यांनी त्याला कधी ही त्रास दिला नाही , किंबहूना त्याच्या कामाला सुयोग्य असा न्याय दिला.
माझ्या नोकरीची शेवटची चार वर्षे मी त्याचा असिस्टंट म्हणून काम केले. त्या अर्थाने तो माझा साहेब होता. साहेब आणि सबाॅर्डिनेट हे नाते म्हणजे सासू सुने सारखेच असते. पण त्या ही परिस्थितीत आमचे मैत्र अखंड टिकले याचे कारण त्याचा दिलदार स्वभाव !
त्याला तीन भाउ आणि एक बहीण ! हा सर्वात थोरला. ते सर्व भाउ आणि बहीण त्याला मोठ्या सन्मानाने वागवतात. आज काल हे अतिशय दुर्मिळ दृष्य आहे.
अनंताला दोन मुली व एक मुलगा ! सर्वजण उच्च शिक्षित असून आपापल्या घरी सुखात आहेत. त्याची मोठी मुलगी डाॅ. सौ. मृदूला हेमंत बेळे , हिने औषधांच्या पेटंट कायद्याचा अभ्यास करून जागतिक स्तरावर आपल्या ज्ञानाचा ठसा उमटविला आहे.
अनंता दोन हजार पांच साली सेवा निवृत्त झाला. सेवा निवृत्ती नंतर Resistivity meter च्या सहाय्याने शेतकर्यांच्या शेतात पाणी कोठे सापडेल , या शास्त्राच्या पूर्वी केलेल्या अभ्यासाचा प्रत्यक्ष उपयोग तो शेतकर्यांना करून देत आहे . हे काम म्हणजे समाजाचे त्र५ण फेडण्याचा त्याचा एक अतिशय प्रामाणिक प्रयत्न आहे. एकूण त्याने स्वतःला खूप बिझी ठेवले आहे.
माझ्या या अत्यंत अत्यंत जिवलग मित्रा विषयी किती लिहू , काय लिहू आणि त्याचे किती व कसे गुण वर्णन करू असे मला झाले आहे. मनातला प्रत्येक भाव मला योग्य शब्दात पकडता आलेला नाही. अजून खूप लिहावसं वाटतय . पण ...........
माझ्या या मित्राला उदंड आणि निरामय आयुष्य लाभू दे , त्याला सर्व प्रकारची सुख समृध्दी लाभू दे , हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना करतो आणि थांबतो.
" मेरी " (MERI , i.e Maharashtra Engineering Research Institute , Nashik.4.) मध्ये मी नोकरीला लागलो त्या वेळी मेरीच्या कॅंटीन मध्ये आमची ओळख झाली. मला रहायला भाड्याने खोली हवी होती , ती मला त्याने मिळवून दिली आणि अशा प्रकारे मेरी जवळच्या " तारवाला नगर " मध्ये आम्ही शेजारच्या शेजारच्या बंगल्यात सख्खे शेजारी झालो. तिथे जी आमची मैत्री जमली , ती आज तागायत तशीच घट्ट आहे. आमची लग्ने ही तीन आठवड्यांच्या अंतराने झाली. एकूण आमची फॅमिली फ्रेंडशिप झाली.
अनंताचा स्वभाव अतिशय दिलदार आहे. तो स्वतःचा विचार करण्या पूर्वी समोरच्याचा विचार करतो. अतिशय प्रामाणिक माणूस ! शासकीय नोकरीत प्रलोभनाचे प्रसंग कधी कधी येतातच ! पण असल्या गोष्टीकडे त्यांने निस्पृहपणे ढूंकूनही कधी पाहिले नाही. कामात एकदम चोख असल्याने आणि उत्तम बुध्दिमत्ता असल्याने तो उगीचच कुणा पुढे झुकण्याचा प्रश्नच नव्हता. ज्या अधिकारी वर्गाने त्याचे हे सदगुण जाणले त्यांनी त्याला कधी ही त्रास दिला नाही , किंबहूना त्याच्या कामाला सुयोग्य असा न्याय दिला.
माझ्या नोकरीची शेवटची चार वर्षे मी त्याचा असिस्टंट म्हणून काम केले. त्या अर्थाने तो माझा साहेब होता. साहेब आणि सबाॅर्डिनेट हे नाते म्हणजे सासू सुने सारखेच असते. पण त्या ही परिस्थितीत आमचे मैत्र अखंड टिकले याचे कारण त्याचा दिलदार स्वभाव !
त्याला तीन भाउ आणि एक बहीण ! हा सर्वात थोरला. ते सर्व भाउ आणि बहीण त्याला मोठ्या सन्मानाने वागवतात. आज काल हे अतिशय दुर्मिळ दृष्य आहे.
अनंताला दोन मुली व एक मुलगा ! सर्वजण उच्च शिक्षित असून आपापल्या घरी सुखात आहेत. त्याची मोठी मुलगी डाॅ. सौ. मृदूला हेमंत बेळे , हिने औषधांच्या पेटंट कायद्याचा अभ्यास करून जागतिक स्तरावर आपल्या ज्ञानाचा ठसा उमटविला आहे.
अनंता दोन हजार पांच साली सेवा निवृत्त झाला. सेवा निवृत्ती नंतर Resistivity meter च्या सहाय्याने शेतकर्यांच्या शेतात पाणी कोठे सापडेल , या शास्त्राच्या पूर्वी केलेल्या अभ्यासाचा प्रत्यक्ष उपयोग तो शेतकर्यांना करून देत आहे . हे काम म्हणजे समाजाचे त्र५ण फेडण्याचा त्याचा एक अतिशय प्रामाणिक प्रयत्न आहे. एकूण त्याने स्वतःला खूप बिझी ठेवले आहे.
माझ्या या अत्यंत अत्यंत जिवलग मित्रा विषयी किती लिहू , काय लिहू आणि त्याचे किती व कसे गुण वर्णन करू असे मला झाले आहे. मनातला प्रत्येक भाव मला योग्य शब्दात पकडता आलेला नाही. अजून खूप लिहावसं वाटतय . पण ...........
माझ्या या मित्राला उदंड आणि निरामय आयुष्य लाभू दे , त्याला सर्व प्रकारची सुख समृध्दी लाभू दे , हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना करतो आणि थांबतो.
No comments:
Post a Comment