माझी " मेरी" या शासकीय संशोधन संस्थेतून, बाहेर साईटवर , क्वालिटी कंट्रोलला बदली झाली. तिथे मी, यशस्वी अभियंता असलेल्या ,श्री. एस. ए. जोशी ,यांच्या सहवासात आलो. त्यांनी मला " साईट " चे तांत्रिक व प्रशासकीय ज्ञान दिले. त्या मुळे मी त्यांना ,कधी ही विसरू शकत नाही. मी त्यांना आदराने, जोशी साहेब म्हणत असतो.
श्री. जोशी साहेब कोणते ही काम करताना, बारकाईने अभ्यास करून करीत असत. त्यांची सगळी नोकरी साईटवरच झालेली असल्याने, साईटवरच्या कामाचे आणि इतर विषयांचे भरपूर किस्से, त्यांच्याकडे होते. ते ऐकताना, आमची दोघांची छान करमणूक व्हायची.
श्री. जोशी साहेबांच्या प्रमोशन नंतर झालेल्या बदली मुळे , त्यांचा " चार्ज " मला मिळाला. माझा अभ्यास व श्री. जोशी साहेबांनी सांगीतलेले कामातले बारकावे , यांच्या सहाय्याने ,मी साईटवर उत्तम प्रकारे काम करू शकलो.
श्री. जोशी साहेब ,सन २००० साली सेवानिवृत्त झाले. त्या नंरचा त्यांचा दिनक्रम ,अतिशय शिस्तबध्द असतो. ते पहाटे साडेतीनला उठतात. ध्यान धारणा करून , देवघराचा परिसर झाडून ,स्वच्छ करतात. एवढ्या पहाटे अंघोळ करून ,ते साग्रसंगीत देवपूजा करतात. देवाच्या नैवेद्यासाठी, रोज ताजा पदार्थ, स्वतः बनवितात. पूजा झाल्यावर प्रसाद भक्षण करतात . एव्हाना सकाळचे साडे सहा वाजलेले असतात. मग सकाळच्या प्रसन्न वेळी ,ते फिरायला जातात. एकूणच त्यांचा दिनक्रम ,आखीव रेखीव असतो.
ते मूळचे कानडी भाषिक आहेत. त्यांच्या घरात, श्रीमद् भागवतावर कानडीत प्रवचने देणारे प्रवचनकार, ते स्वखर्चाने बोलावत असत . सौ. जोशी वहिनी सुध्दा, खूपच धार्मिक होत्या.
श्री. जोशी साहेबांच्या आयुष्यात ,एक अशी घटना घडली आहे की, जी ऐकून कोणाचे ही ह्रदय, पिळवटून जाईल. श्री. जोशी साहेबांच्या सेवानिवृत्ती नंतर, ते दोघे मिळून दर वर्षी माघ महिन्यात, अलाहाबादला ( प्रयागला ) जात असत. माघ महिना म्हणजे थंडीचे दिवस ! उत्तरेत थंडी फार असते. ते रोज पहाटे चार वाजता, होडीने त्रिवेणी संगमावर अंघोळ करून , तिथे चाललेली प्रवचने ऐकत . हा कार्यक्रम माघ महिना भर ,चालत असे. अशी अकरा वर्षे, त्यांनी सातत्याने , हा पवित्र उपक्रम , मोठ्या श्रध्देने पार पाडला.
बाराव्या वर्षी ते दोघे ,नेहमी प्रमाणे प्रयागला, माघ महिन्यात गेले होते. ठरल्या प्रमाणे, ते पहाटे चार वाजता होडीतून, त्रिवेणी संगमावर स्नानासाठी गेले. थंडीत गारपाण्या मुळे म्हणा किंवा कशामुळे म्हणा, सौ. वहिनींना त्रिवेणी संगमावर स्नान केल्या नंतर , छातीत गंभीरपणे दुखायला लागले. होडीवाला व इतरांच्या मदतीने, त्यांना एवढ्या पहाटे ,कसेबसे हाॅस्पिटलमध्ये नेले गेले. डाॅक्टरांनी खूप प्रयत्न केले ,पण उपयोग झाला नाही. सौ. वहिनी " गेल्या ".
अलाहाबाद सारख्या दूरच्या ठिकाणी, श्री. जोशी साहेब ,एकटे पडले. काय करावे समजेना. मुलगा मुलगी सांगलीत. त्यांना कळवून ते यायला ,खूप वेळ लागणार . सौ. जोशी वहिनींना " तशा अवस्थेत ", रूग्णवाहिकेने सांगलीला न्यायचे ,तर दोन दिवस लागणार. श्री. जोशी साहेबांनी निर्णय घेतला व सौ. वहिनींचा " अंत्यविधी " प्रयाग क्षेत्री स्वतःच केला. नंतर मुलगा आणि मुलगी यांना , त्यांच्या आई , ( सौ. जोशी वहिनी ) गेल्याचा आणि अंत्यविधी स्वतः केल्याचा, फोन केला. असा प्रसंग ,कोणावर ही येउ नये. तो श्री. जोशी साहेबांच्या वर आला , पण त्यांनी ज्या धीराने तो हाताळला, त्याला तोड नाही.
या गोष्टीला, अंदाजे आठ वर्षे झाली असतील. सध्या श्री. जोशी साहेब , सांगलीत आपल्या स्वतःच्या, " गौरी शंकर " या बंगल्यात मुलगा, सून आणि नातवंडे , यांच्या सह निरपेक्ष वृत्तीने ,आनंदात कालक्रमणा करीत आहेत. त्यांची विवाहित मुलगी सुध्दा, सांगलीतच असते.
अशा या धीरोदात्त आणि अत्यंत धार्मिक वृत्तीच्या, यशस्वी अभियंता असलेल्या ,श्री. एस. ए. जोशी साहेबांना, उत्तम व निरामय आयुष्य लाभो, ही प्रार्थना करतो आणि थांबतो.
श्री. जोशी साहेब कोणते ही काम करताना, बारकाईने अभ्यास करून करीत असत. त्यांची सगळी नोकरी साईटवरच झालेली असल्याने, साईटवरच्या कामाचे आणि इतर विषयांचे भरपूर किस्से, त्यांच्याकडे होते. ते ऐकताना, आमची दोघांची छान करमणूक व्हायची.
श्री. जोशी साहेबांच्या प्रमोशन नंतर झालेल्या बदली मुळे , त्यांचा " चार्ज " मला मिळाला. माझा अभ्यास व श्री. जोशी साहेबांनी सांगीतलेले कामातले बारकावे , यांच्या सहाय्याने ,मी साईटवर उत्तम प्रकारे काम करू शकलो.
श्री. जोशी साहेब ,सन २००० साली सेवानिवृत्त झाले. त्या नंरचा त्यांचा दिनक्रम ,अतिशय शिस्तबध्द असतो. ते पहाटे साडेतीनला उठतात. ध्यान धारणा करून , देवघराचा परिसर झाडून ,स्वच्छ करतात. एवढ्या पहाटे अंघोळ करून ,ते साग्रसंगीत देवपूजा करतात. देवाच्या नैवेद्यासाठी, रोज ताजा पदार्थ, स्वतः बनवितात. पूजा झाल्यावर प्रसाद भक्षण करतात . एव्हाना सकाळचे साडे सहा वाजलेले असतात. मग सकाळच्या प्रसन्न वेळी ,ते फिरायला जातात. एकूणच त्यांचा दिनक्रम ,आखीव रेखीव असतो.
ते मूळचे कानडी भाषिक आहेत. त्यांच्या घरात, श्रीमद् भागवतावर कानडीत प्रवचने देणारे प्रवचनकार, ते स्वखर्चाने बोलावत असत . सौ. जोशी वहिनी सुध्दा, खूपच धार्मिक होत्या.
श्री. जोशी साहेबांच्या आयुष्यात ,एक अशी घटना घडली आहे की, जी ऐकून कोणाचे ही ह्रदय, पिळवटून जाईल. श्री. जोशी साहेबांच्या सेवानिवृत्ती नंतर, ते दोघे मिळून दर वर्षी माघ महिन्यात, अलाहाबादला ( प्रयागला ) जात असत. माघ महिना म्हणजे थंडीचे दिवस ! उत्तरेत थंडी फार असते. ते रोज पहाटे चार वाजता, होडीने त्रिवेणी संगमावर अंघोळ करून , तिथे चाललेली प्रवचने ऐकत . हा कार्यक्रम माघ महिना भर ,चालत असे. अशी अकरा वर्षे, त्यांनी सातत्याने , हा पवित्र उपक्रम , मोठ्या श्रध्देने पार पाडला.
बाराव्या वर्षी ते दोघे ,नेहमी प्रमाणे प्रयागला, माघ महिन्यात गेले होते. ठरल्या प्रमाणे, ते पहाटे चार वाजता होडीतून, त्रिवेणी संगमावर स्नानासाठी गेले. थंडीत गारपाण्या मुळे म्हणा किंवा कशामुळे म्हणा, सौ. वहिनींना त्रिवेणी संगमावर स्नान केल्या नंतर , छातीत गंभीरपणे दुखायला लागले. होडीवाला व इतरांच्या मदतीने, त्यांना एवढ्या पहाटे ,कसेबसे हाॅस्पिटलमध्ये नेले गेले. डाॅक्टरांनी खूप प्रयत्न केले ,पण उपयोग झाला नाही. सौ. वहिनी " गेल्या ".
अलाहाबाद सारख्या दूरच्या ठिकाणी, श्री. जोशी साहेब ,एकटे पडले. काय करावे समजेना. मुलगा मुलगी सांगलीत. त्यांना कळवून ते यायला ,खूप वेळ लागणार . सौ. जोशी वहिनींना " तशा अवस्थेत ", रूग्णवाहिकेने सांगलीला न्यायचे ,तर दोन दिवस लागणार. श्री. जोशी साहेबांनी निर्णय घेतला व सौ. वहिनींचा " अंत्यविधी " प्रयाग क्षेत्री स्वतःच केला. नंतर मुलगा आणि मुलगी यांना , त्यांच्या आई , ( सौ. जोशी वहिनी ) गेल्याचा आणि अंत्यविधी स्वतः केल्याचा, फोन केला. असा प्रसंग ,कोणावर ही येउ नये. तो श्री. जोशी साहेबांच्या वर आला , पण त्यांनी ज्या धीराने तो हाताळला, त्याला तोड नाही.
या गोष्टीला, अंदाजे आठ वर्षे झाली असतील. सध्या श्री. जोशी साहेब , सांगलीत आपल्या स्वतःच्या, " गौरी शंकर " या बंगल्यात मुलगा, सून आणि नातवंडे , यांच्या सह निरपेक्ष वृत्तीने ,आनंदात कालक्रमणा करीत आहेत. त्यांची विवाहित मुलगी सुध्दा, सांगलीतच असते.
अशा या धीरोदात्त आणि अत्यंत धार्मिक वृत्तीच्या, यशस्वी अभियंता असलेल्या ,श्री. एस. ए. जोशी साहेबांना, उत्तम व निरामय आयुष्य लाभो, ही प्रार्थना करतो आणि थांबतो.
No comments:
Post a Comment