आज, मी तुम्हाला ओळख करून देणार आहे , त्यांचे नाव आहे ,कै. अरूण विश्वंभर ऊर्फ बाबूराव चांदोरकर. आज ते आणि त्यांच्या पत्नी उषा वहिनी , दोघे ही हयात नाहीत. पण त्या दोघांच्या आठवणीने , माझ्या मनाचा हळवा कोपरा, नक्कीच व्यापलेला आहे.
बाबूराव आणि मी , आम्ही दोघेही, " मेरी " या शासकीय संशोधन संस्थेत नोकरीला असल्याने ,आमचा परिचय होता. पण ते जेंव्हा आमच्याच विभागात बदलून आले , त्या वेळी परिचयाचे रूपांतर, प्रगाढ स्नेहात झाले.
बाबूराव म्हणजे शिस्तप्रिय माणूस ! त्यांना वाचनाची जबरदस्त आवड होती. सुट्टीच्या दिवशी एखादे पुस्तक हातात धरले, तर ते संपविल्या शिवाय खाली ठेवत नसत. बाबूराव एके काळी, मल्लखांब पटू होते. त्यांना बाईक चालविण्याचा शौक होता. तसेच ते पोहण्यात ही तरबेज होते. एकदा नाशकातील गोदावरी नदीला पूर आलेला असताना, त्यांनी पुरात उडी ठोकून ,बुडणार्या माणसाला वाचविण्याचे यशस्वी धाडस केले होते. बाबूरावांना पाठ दुखीचा त्रास सुरू झाल्या नंतर मल्लखांब , बाईक चालविणे , पोहणे या गोष्टी डाॅक्टरांच्या सल्ल्या नुसार , बंद कराव्या लागल्या.
कोणती ही नवीन गोष्ट शिकण्यात , त्यांना रस होता. गणित या विषयात, त्यांना विशेष गती होती. मुलांना गणित शिकविताना ,त्यातली एखादी गोष्ट अडली, तर त्याचा पिच्छा करून , गणित सोडविल्या शिवाय बाबूराव स्वस्थ बसायचे नाहीत.
बाबूराव तसे कडक आणि वेळेला स्पष्ट वक्ते होते. बाबूराव मैत्रीला जागणारे होते. एकदा आॅफिसमध्ये, मला कोणीतरी कांही तरी , लागट बोलले. त्या बरोबर बाबूरावांचा पारा चढला .त्यांनी त्या व्यक्तीला, असं कांही सुनावलं की ,त्यांने तिथून काढता पाय घेतला. त्या व्यक्तीने पुन्हा ,तो विषय काढण्याचे धाडस ,कधी ही केले नाही.
बाबूरावांच्या मनाचा हळवा कोपरा म्हणजे, त्यांची मुले ! मुलांना बरं नसलं तर ,एरवी मनाने कडक असणारे बाबूराव ,फार हळवे व्हायचे.
बाबूराव म्हणजे खवैय्या माणूस ! त्यांच्या पत्नी उषावहीनी , या चांदोरकरांच्या घरची अन्नपूर्णाच होत्या. वहिनींचं माहेर त्र्यंबकेश्वर ! तिथे माहेरी आणि इथे सासरी ,दोन्हीकडे माणसांची आवक जावक भरपूर असायची. पण
वहिनींनी कधी ही ,कोणाला टाळलं नाही. त्यांच्या हाताला वेगळीच चव होती. त्यांच्या हातचा एखादा पदार्थ तुम्ही खाल्लात, तर ती विशिष्ठ चव ,तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. दर नवरात्रात ते आम्हा दोघांना मेहूण म्हणून, जेवायला बोलावत. वहिनींच्या हातच्या स्वादिष्ट पुरण पोळीची चव , अजून ही आमच्या दोघांच्या जिभेवर रेंगाळते आहे. तसेच वहिनींच्या हातचा तिळगूळ ! तो चविष्ठ, खुसखुशीत तिळगूळ ,मी आयुष्यात कधी ही विसरणार नाही. दर वर्षी संक्रांतीला ,मला त्या तिळगुळा मुळे ,बाबुराव आणि उषा वहिनींची आठवण झाल्या शिवाय रहात नाही.
बाबूराव दि. ८ जून १९९३ ला नोकरीत असतानाच गेले. बरेच दिवस ते आजारी होते. भरपूर उपचार झाले , पण उपयोग झाला नाही. ते गेले त्या वेळी मी , शासकीय बदलीवर सांगलीत होतो. बाबूरावांची व माझी , ते जाण्या पूर्वीची , शेवटची भेट झाली नाही , याचे मला आज ही दुःख होते आहे.
उषावहिनी दि. २२ जून १९९८ ला गेल्या. एक हसत मुख , सुगरण ,व्यक्तीमत्व काळाच्या पडद्या आड गेलं !
बाबुरावांना चि. उदय व चि. सौ. कल्याणी कुलकर्णी , अशी दोन मुले आहेत. दोघे ही आपापल्या संसारात सुव्यवस्थित आहेत.
मी हा लेख लिहीतो आहे, त्या वेळी जून महिनाच चालू आहे. दोघांचे ही स्मृतिदिन , याच महिन्यात आहेत. कै. बाबूराव आणि कै. उषावहिनी या दोघांना , प्रेमपूर्वक आदरांजली वाहतो आणि थांबतो.
बाबूराव आणि मी , आम्ही दोघेही, " मेरी " या शासकीय संशोधन संस्थेत नोकरीला असल्याने ,आमचा परिचय होता. पण ते जेंव्हा आमच्याच विभागात बदलून आले , त्या वेळी परिचयाचे रूपांतर, प्रगाढ स्नेहात झाले.
बाबूराव म्हणजे शिस्तप्रिय माणूस ! त्यांना वाचनाची जबरदस्त आवड होती. सुट्टीच्या दिवशी एखादे पुस्तक हातात धरले, तर ते संपविल्या शिवाय खाली ठेवत नसत. बाबूराव एके काळी, मल्लखांब पटू होते. त्यांना बाईक चालविण्याचा शौक होता. तसेच ते पोहण्यात ही तरबेज होते. एकदा नाशकातील गोदावरी नदीला पूर आलेला असताना, त्यांनी पुरात उडी ठोकून ,बुडणार्या माणसाला वाचविण्याचे यशस्वी धाडस केले होते. बाबूरावांना पाठ दुखीचा त्रास सुरू झाल्या नंतर मल्लखांब , बाईक चालविणे , पोहणे या गोष्टी डाॅक्टरांच्या सल्ल्या नुसार , बंद कराव्या लागल्या.
कोणती ही नवीन गोष्ट शिकण्यात , त्यांना रस होता. गणित या विषयात, त्यांना विशेष गती होती. मुलांना गणित शिकविताना ,त्यातली एखादी गोष्ट अडली, तर त्याचा पिच्छा करून , गणित सोडविल्या शिवाय बाबूराव स्वस्थ बसायचे नाहीत.
बाबूराव तसे कडक आणि वेळेला स्पष्ट वक्ते होते. बाबूराव मैत्रीला जागणारे होते. एकदा आॅफिसमध्ये, मला कोणीतरी कांही तरी , लागट बोलले. त्या बरोबर बाबूरावांचा पारा चढला .त्यांनी त्या व्यक्तीला, असं कांही सुनावलं की ,त्यांने तिथून काढता पाय घेतला. त्या व्यक्तीने पुन्हा ,तो विषय काढण्याचे धाडस ,कधी ही केले नाही.
बाबूरावांच्या मनाचा हळवा कोपरा म्हणजे, त्यांची मुले ! मुलांना बरं नसलं तर ,एरवी मनाने कडक असणारे बाबूराव ,फार हळवे व्हायचे.
बाबूराव म्हणजे खवैय्या माणूस ! त्यांच्या पत्नी उषावहीनी , या चांदोरकरांच्या घरची अन्नपूर्णाच होत्या. वहिनींचं माहेर त्र्यंबकेश्वर ! तिथे माहेरी आणि इथे सासरी ,दोन्हीकडे माणसांची आवक जावक भरपूर असायची. पण
बाबूराव दि. ८ जून १९९३ ला नोकरीत असतानाच गेले. बरेच दिवस ते आजारी होते. भरपूर उपचार झाले , पण उपयोग झाला नाही. ते गेले त्या वेळी मी , शासकीय बदलीवर सांगलीत होतो. बाबूरावांची व माझी , ते जाण्या पूर्वीची , शेवटची भेट झाली नाही , याचे मला आज ही दुःख होते आहे.
उषावहिनी दि. २२ जून १९९८ ला गेल्या. एक हसत मुख , सुगरण ,व्यक्तीमत्व काळाच्या पडद्या आड गेलं !
बाबुरावांना चि. उदय व चि. सौ. कल्याणी कुलकर्णी , अशी दोन मुले आहेत. दोघे ही आपापल्या संसारात सुव्यवस्थित आहेत.
मी हा लेख लिहीतो आहे, त्या वेळी जून महिनाच चालू आहे. दोघांचे ही स्मृतिदिन , याच महिन्यात आहेत. कै. बाबूराव आणि कै. उषावहिनी या दोघांना , प्रेमपूर्वक आदरांजली वाहतो आणि थांबतो.
No comments:
Post a Comment