" वधू वर सूचक मंडळ "....एक अनुभव.
*******************************
माझी पत्नी सौ. रजनी आणि तिच्या स्नेही सौ. निशा अभ्यंकर , अशा दोघींनी मिळून एकमताने सन् १९९५ ते सन् २००१ अशी सहा वर्षे, मिरज येथे ,वधू वर सूचक मंडळ चालविले. पैसे मिळविणे हा हेतू ,अजिबात नव्हता. कांही सामाजिक कार्य करावे ,या उद्देशाने आणि त्या काळची समाजिक गरज ओळखून, त्यांनी " वधू वर सूचक मंडळ " चालविले. सुरवातीला आपल्याकडे मुलांची किंवा मुलींची स्थळे नसतील ,तर आपल्याकडे कोण येणार ? हा विचार करून मिरजेत, सांगलीत , नात्यातल्या व ओळखीच्या, घरोघरी जावून ,त्यांनी स्थळांची माहिती गोळा केली. जरा बर्या पैकी स्थळांची माहिती गोळा झाल्यावर , मिरजेच्या मंगल कार्यालयात, " अक्षता वधू वर सूचक मंडळाचा " बोर्ड लावला.
वधू वर सूचक मंडळ नवीन असल्याने व या क्षेत्राचा अनुभव नसल्याने , शिवाय स्वभाव भिडस्त असल्याने , हे वधू वर सूचक मंडळ चालविताना आलेले अनुभव, मोठे मनोरंजक होते.
एक दिवस, एक पाच फूट सहा इंच उंचीची मुलगी ,अवेळीच आमच्या घरी आली आणि " काकू , तुमच्याकडे सहा फुटाची मुलं आहेत का हो ? " असा प्रश्न तिने टाकला. बाजारात भाजी आणायला गेल्यावर, अमूक एक भाजी तुमच्याकडे आहे का ? असं विचारल्या प्रमाणे तिचा पवित्रा होता.
आणखीन एकजण ओळखीचे गृहस्थ होते. त्यांची मुलगी लग्नाची होती. प्रथम आल्या आल्या ,त्यांनी जाहीर करून टाकलं " मी वधू वर सूचक मंडळाची फी देण्याचा प्रश्नच येत नाही , कारण मी घरच्या सारखाच आहे . मी आल्यावर, आदरातिथ्य म्हणून , तुम्ही मला चहा मला चहा द्यालच ! आता माझ्या जावयासाठीच्या अपेक्षा सांगतो . रोज संध्याकाळी ,माझ्या मुलीला फिरायला नेणारा मुलगा, जावई म्हणून, मला हवा आहे. मेकॅनिकल इंजिनीयर अजिबात नको. तो कंपनीत कामाला गेला की , रात्री कधी परतेल ते सांगता येत नाही " . त्यांची ही अजब अट पाहून आम्हाला हसावे की रडावे , तेच समजेना !
वधू वर सूचक मंडळाची वेळ आणि वार ही , ठरविलेले होते. आमच्या गल्लीतील एक ओळखीच्या बाई ,वेळ संपल्यावर आरामात यायच्या , बैठकीवर पाय पसरून आरामात बसायच्या आणि स्थळे सावकाश लिहून घ्यायच्या. त्या वेळी ,आमच्याकडे वैयक्तीक कामासाठी कोणी आलं, तरी त्यांना त्याची फिकीर नसायची. भिडस्त स्वभावामुळे, आम्ही गप्प बसून, हे सर्व सहन करत असू.
एकदा एक मुलगी आली आणि म्हणू लागली " काकू , ज्याच्या कडे स्वतःचा बंगला , चार चाकी , घरी नोकर चाकर असलेलं स्थळ आहे का ? " ही १९९५ ते २००१ या सालातली गोष्ट आहे. त्या वेळी मुलींचे पालक किंवा स्वतः मुली ही ,स्थळासाठी यायच्या. तिच्या वरा बद्दलच्या अटी ऐकून, तिथेच बसलेले सदगृहस्थ तिला म्हणाले " बाळ , तू पन्नास , पंचावन्न वर्षाच्या गृहस्थाशी लग्न कर , तरच तुझ्या या गहन अटी पूर्ण झालेल्या तुला मिळतील "
असेच एक दिवस एक गृहस्थ आले आणि म्हणाले " आमच्या मुलीला बस लागते , तेंव्हा तुम्ही रेल्वेने जाता येईल ,अशाच गावची स्थळं मला सांगा " खरं तर बस लागू नये याची काळजी घेता येते , हे त्या गृहस्थांच्या गावी ही नव्हते. काय सांगायचं अशा लोकांना ?
त्याच वेळी पुण्याहून आलेल्या, एका मुलाच्या वडीलांनी सांगीतले की , पुण्यात एका वधू वर सूचक मंडळात, ते गेले होते. तिथे एका मुलीच्या अपेक्षा ,त्यांच्या वाचनात आल्या. तिने लिहीले होते , मुलगा एकूलता एक असावा , पुढे त्यांनी जे सांगीतले ते कल्पनेच्या पलिकडचे होते . मुलाच्या आई वडीलांच्या फोटोला " हार " घातलेला असावा. हे ऐकून आम्ही सर्द झालो.
आता काळ बदलला आहे. १९९५ ते २००१ या काळात ,मिरजे सारख्या मध्यम शहरात ,बहुतांशी मुलींचे पालक किंवा स्वतः मुली स्थळासाठी येत असत. आता मुलांचे पालक व मुले, वधूच्या शोधात फिरत असतात, असे ऐकले आहे.
आमच्या " अक्षता वधू वर सूचक " मंडळा तर्फे ज्यांचे विवाह ठरले , त्या पैकी कांही जण आज ही संपर्कात आहेत ,याचे समाधान निश्चित आहे.
वधू वर सूचक मंडळ चालविणे , हा एक वेगळा अनुभव होता, हे मात्र नक्की !
*******************************
माझी पत्नी सौ. रजनी आणि तिच्या स्नेही सौ. निशा अभ्यंकर , अशा दोघींनी मिळून एकमताने सन् १९९५ ते सन् २००१ अशी सहा वर्षे, मिरज येथे ,वधू वर सूचक मंडळ चालविले. पैसे मिळविणे हा हेतू ,अजिबात नव्हता. कांही सामाजिक कार्य करावे ,या उद्देशाने आणि त्या काळची समाजिक गरज ओळखून, त्यांनी " वधू वर सूचक मंडळ " चालविले. सुरवातीला आपल्याकडे मुलांची किंवा मुलींची स्थळे नसतील ,तर आपल्याकडे कोण येणार ? हा विचार करून मिरजेत, सांगलीत , नात्यातल्या व ओळखीच्या, घरोघरी जावून ,त्यांनी स्थळांची माहिती गोळा केली. जरा बर्या पैकी स्थळांची माहिती गोळा झाल्यावर , मिरजेच्या मंगल कार्यालयात, " अक्षता वधू वर सूचक मंडळाचा " बोर्ड लावला.
वधू वर सूचक मंडळ नवीन असल्याने व या क्षेत्राचा अनुभव नसल्याने , शिवाय स्वभाव भिडस्त असल्याने , हे वधू वर सूचक मंडळ चालविताना आलेले अनुभव, मोठे मनोरंजक होते.
एक दिवस, एक पाच फूट सहा इंच उंचीची मुलगी ,अवेळीच आमच्या घरी आली आणि " काकू , तुमच्याकडे सहा फुटाची मुलं आहेत का हो ? " असा प्रश्न तिने टाकला. बाजारात भाजी आणायला गेल्यावर, अमूक एक भाजी तुमच्याकडे आहे का ? असं विचारल्या प्रमाणे तिचा पवित्रा होता.
आणखीन एकजण ओळखीचे गृहस्थ होते. त्यांची मुलगी लग्नाची होती. प्रथम आल्या आल्या ,त्यांनी जाहीर करून टाकलं " मी वधू वर सूचक मंडळाची फी देण्याचा प्रश्नच येत नाही , कारण मी घरच्या सारखाच आहे . मी आल्यावर, आदरातिथ्य म्हणून , तुम्ही मला चहा मला चहा द्यालच ! आता माझ्या जावयासाठीच्या अपेक्षा सांगतो . रोज संध्याकाळी ,माझ्या मुलीला फिरायला नेणारा मुलगा, जावई म्हणून, मला हवा आहे. मेकॅनिकल इंजिनीयर अजिबात नको. तो कंपनीत कामाला गेला की , रात्री कधी परतेल ते सांगता येत नाही " . त्यांची ही अजब अट पाहून आम्हाला हसावे की रडावे , तेच समजेना !
वधू वर सूचक मंडळाची वेळ आणि वार ही , ठरविलेले होते. आमच्या गल्लीतील एक ओळखीच्या बाई ,वेळ संपल्यावर आरामात यायच्या , बैठकीवर पाय पसरून आरामात बसायच्या आणि स्थळे सावकाश लिहून घ्यायच्या. त्या वेळी ,आमच्याकडे वैयक्तीक कामासाठी कोणी आलं, तरी त्यांना त्याची फिकीर नसायची. भिडस्त स्वभावामुळे, आम्ही गप्प बसून, हे सर्व सहन करत असू.
एकदा एक मुलगी आली आणि म्हणू लागली " काकू , ज्याच्या कडे स्वतःचा बंगला , चार चाकी , घरी नोकर चाकर असलेलं स्थळ आहे का ? " ही १९९५ ते २००१ या सालातली गोष्ट आहे. त्या वेळी मुलींचे पालक किंवा स्वतः मुली ही ,स्थळासाठी यायच्या. तिच्या वरा बद्दलच्या अटी ऐकून, तिथेच बसलेले सदगृहस्थ तिला म्हणाले " बाळ , तू पन्नास , पंचावन्न वर्षाच्या गृहस्थाशी लग्न कर , तरच तुझ्या या गहन अटी पूर्ण झालेल्या तुला मिळतील "
असेच एक दिवस एक गृहस्थ आले आणि म्हणाले " आमच्या मुलीला बस लागते , तेंव्हा तुम्ही रेल्वेने जाता येईल ,अशाच गावची स्थळं मला सांगा " खरं तर बस लागू नये याची काळजी घेता येते , हे त्या गृहस्थांच्या गावी ही नव्हते. काय सांगायचं अशा लोकांना ?
त्याच वेळी पुण्याहून आलेल्या, एका मुलाच्या वडीलांनी सांगीतले की , पुण्यात एका वधू वर सूचक मंडळात, ते गेले होते. तिथे एका मुलीच्या अपेक्षा ,त्यांच्या वाचनात आल्या. तिने लिहीले होते , मुलगा एकूलता एक असावा , पुढे त्यांनी जे सांगीतले ते कल्पनेच्या पलिकडचे होते . मुलाच्या आई वडीलांच्या फोटोला " हार " घातलेला असावा. हे ऐकून आम्ही सर्द झालो.
आता काळ बदलला आहे. १९९५ ते २००१ या काळात ,मिरजे सारख्या मध्यम शहरात ,बहुतांशी मुलींचे पालक किंवा स्वतः मुली स्थळासाठी येत असत. आता मुलांचे पालक व मुले, वधूच्या शोधात फिरत असतात, असे ऐकले आहे.
आमच्या " अक्षता वधू वर सूचक " मंडळा तर्फे ज्यांचे विवाह ठरले , त्या पैकी कांही जण आज ही संपर्कात आहेत ,याचे समाधान निश्चित आहे.
वधू वर सूचक मंडळ चालविणे , हा एक वेगळा अनुभव होता, हे मात्र नक्की !
No comments:
Post a Comment