Thursday, 2 May 2019

लग्न जुळवण्याचे नवीन निकष....

           एके काळी मुलगी देताना मुलाची व मुलीची कुंडली जमली आणि मुलाचा होकार आला की ,लग्न जमायचे. मुलीचा होकार , मुलीचे पालक गृृृृहितच धरायचे.
             नंतरच्या काळात मुलगा व मुलगी शिकलेले असल्याने ,मुलीची व मुलाची पत्रिका जमल्या नंतर ,मुलीचा त्या मुलाच्या स्थळाला होकार आहे किंवा नाही ,ही बाब ही महत्वाची मानली जाऊ लागली. मुलाचा होकार आहे , पण मुलीचा नसल्यास , ते लग्न होत नसे.
           नंतरच्या काळात, मुली ही मुलांच्या बरोबरीने , स्वतंत्रपणे अर्थार्जन ही करू लागल्या , त्या मुळे त्या स्वतःच्या मताचा आग्रह धरू लागल्या.बदलत्या काळानुसार ते योग्य मानले गेले.
           नवीन आर्थिक युगात ,लग्न जमविण्याचे जुने निकष कालबाह्य झाले आणि नवीन निकष उदयाला आले.
           मुलीचे किंवा मुलाचे आई वडील ,आता होणार्‍या सुनेची किंवा जावयाची आणि त्यांच्या कुटूंबाची ,आर्थिक पत जाणून घेत आहेत. समोरच्या पार्टीचे जे वैभव दिसत आहे ते खरे आहे की , कर्जावर उभारलेले आहे ? मुलाने किंवा मुलीने किंवा त्यांच्या पालकांनी , घरा / बंगल्यासाठी  किंवा व्यवसाया साठी , कर्ज घेतले असल्यास ते फेडण्याची , त्यांची खरीखरी आर्थिक कुवत आहे की नाही ? घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरले जातात की थकवले जातात , याची माहिती घेतली जाते.         
            त्या साठी त्या त्या कुटूंबांची, गुप्त रीत्या आर्थिक माहिती मिळविणार्‍या , स्वतंत्र गुप्तचर  यंत्रणा कार्यरत आहेत. थोडक्यात मुलाच्या व मुलीच्या कुटूंबाची आर्थिक कुंडली जुळते की नाही , ते पाहिले जाते आणि त्याला सध्याच्या काळात लग्न ठरविण्या पूर्वी ,महत्व ही दिले जाते.
             या संबंधीची बातमी  दिव्य मराठी या दैनिकाच्या नाशिक आवृत्ती मध्ये आलेली होती.
             आता मुलगी देताना किंवा करून घेताना ,मुलाच्या आणि मुलीच्या कुटूंबांची आर्थिक कुंडली जमणे , हे ही खूप महत्वाचे ठरणार आहे.
             नवीन काळाची नवीन दिशा व नवीन विचार प्रवाह , हा असा आहे.........

No comments:

Post a Comment