फोटोत दिसत आहेत ते ,माझे मिरजेचे स्नेही श्री. शरद उत्तुरकर. वय वर्षे ८१ फक्त. उत्साह मात्र , वय वर्षे १८ चा ! रोज किमान २५ किमी सायकलींग करतात. बायकोशी जरा खटका उडाला, तर त्या दिवशी ३० किमी किंवा त्या ही पेक्षा जास्त ! खटका किती " तीव्रतेचा " आहे, त्यावर किती सायकलींग करायचं ,ते ठरतं !
एवढं सायकलींग करायचं म्हटलं, तर कंटाळा येउ शकतो. असा कंटाळा येउ नये म्हणून ,त्यावर उपाय काय ? श्री. शरद उत्तुरकरांनी त्यावर ,आपल्या कुणाला ही सुचणार नाही, असा उपाय शोधलाय. तो म्हणजे पाढे पाठ करणे. या वयाला म्हणजे, ८१ व्या वर्षी सायकलींग करता करता, त्यांनी ९९ पर्यंतचे पाढे पाठ केले आहेत. फार पूर्वी शाळेत शिकवले जाणारे पावकी , निमकी , पाउणकी , सवायकी , दिडकी आणि अडीचकी हे पाढे ,त्यांना आज ही मुखोदगत आहेतच ! रोज किमान २५ किमी सायकलींग आणि त्याच बरोबर हे पाढे पाठ करण्याचे व्रत , हे अजब मिश्रण असलेले, मिरजेचे श्री. शरद उत्तुरकर माझे स्नेही आहेत , याचा मला सार्थ अभिमान आहे.
श्री. शरदरावांना हा सायकलींगचा छंद ,कसा लागला त्याची कहाणी, ह्रदयद्रावक अशीच आहे. ते सांगली बॅंकेत नोकरीला होते. वयाच्या चाळीशीच्या आसपास, त्यांचे पाय खूप दुखायला लागले. अनेक प्रकारचे उपचार झाले ,पण गूण नाही. पाय इतके दुखायचे की, त्यांना वाटायचे ,रेल्वे खाली जाउन आपले पाय तोडून घ्यावेत. या त्रासाला कंटाळून, त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. शेवटी मिरजेतल्या एका प्रसिध्द आर्थोपेडिक सर्जनने ,त्यांचे आॅपरेशन केले. पण कांहीही उपयोग झाला नाही.
आॅपरेशन नंतर डाॅक्टरांनी त्यांना पथ्य म्हणून ,पोहणे आणि सायकलींग कधी ही करायचे नाही ,असे सांगीतले. मरणप्राय वेदनेने बेजार झालेल्या शरदरावांनी ,डाॅक्टरांनी सांगीतलेली पथ्ये मोडायची, म्हणजे आपल्याला मरण येईल व या त्रासातून सुटका होईल, या भावनेने पोहणे आणि सायकलींग सुरू केले. .....आणि आश्चर्य म्हणजे, त्यांचे दुखणे हळूहळू कमी होत गेले .आज शरदरावांना आपले पाय कधी दुखत होते , याची आठवण ही येत नाही. ते अतिशय आनंदी आणि निरामय आयुष्य जगत आहेत.
कारणपरत्वे ते ,विविध विषयावर , कविता ही करतात .परवाच ते नाशिकला आमच्या घरी आले होते. त्या वेळी त्यांनी ,माझ्यावर केलेली कविता मला भेट दिली. आपल्यावर कोणी कविता करते आहे , ही संकल्पनाच मनाला आनंददायी आहे. असा भरभरून आनंद, त्यांनी अनेकांना दिलेला आहे. नुकताच त्यांचा काव्य संग्रह, त्यांच्या पत्नीने आणि मुलींनी प्रकाशित केला आहे.
श्री. शरद उत्तुरकरांना ,त्यांच्या पत्नीची समर्थ साथ आहेच . त्यांना दोन कन्या आहेत. त्या दोघींची लग्ने झाली आहेत व त्या आपापल्या जागी आनंदात आहेत. श्री. शरदरावांचे वास्तव्य मिरजेत असले ,तरी ते मधून मधून आपल्या मुलींच्याकडे जातात. तिथे त्यांच्या मुलींनी ,बाबांच्या साठी सायकल ठेवलेली असते. तिथे ही ते सायकलींग करतातच !
अशा या कविमनाच्या , सदाबहार व आनंदी श्री. शरदराव उत्तुरकरांना व त्यांच्या पत्नीला ,परमेश्वराने उदंड आणि निरामय आयुष्य द्यावे ,ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.
एवढं सायकलींग करायचं म्हटलं, तर कंटाळा येउ शकतो. असा कंटाळा येउ नये म्हणून ,त्यावर उपाय काय ? श्री. शरद उत्तुरकरांनी त्यावर ,आपल्या कुणाला ही सुचणार नाही, असा उपाय शोधलाय. तो म्हणजे पाढे पाठ करणे. या वयाला म्हणजे, ८१ व्या वर्षी सायकलींग करता करता, त्यांनी ९९ पर्यंतचे पाढे पाठ केले आहेत. फार पूर्वी शाळेत शिकवले जाणारे पावकी , निमकी , पाउणकी , सवायकी , दिडकी आणि अडीचकी हे पाढे ,त्यांना आज ही मुखोदगत आहेतच ! रोज किमान २५ किमी सायकलींग आणि त्याच बरोबर हे पाढे पाठ करण्याचे व्रत , हे अजब मिश्रण असलेले, मिरजेचे श्री. शरद उत्तुरकर माझे स्नेही आहेत , याचा मला सार्थ अभिमान आहे.
श्री. शरदरावांना हा सायकलींगचा छंद ,कसा लागला त्याची कहाणी, ह्रदयद्रावक अशीच आहे. ते सांगली बॅंकेत नोकरीला होते. वयाच्या चाळीशीच्या आसपास, त्यांचे पाय खूप दुखायला लागले. अनेक प्रकारचे उपचार झाले ,पण गूण नाही. पाय इतके दुखायचे की, त्यांना वाटायचे ,रेल्वे खाली जाउन आपले पाय तोडून घ्यावेत. या त्रासाला कंटाळून, त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. शेवटी मिरजेतल्या एका प्रसिध्द आर्थोपेडिक सर्जनने ,त्यांचे आॅपरेशन केले. पण कांहीही उपयोग झाला नाही.
आॅपरेशन नंतर डाॅक्टरांनी त्यांना पथ्य म्हणून ,पोहणे आणि सायकलींग कधी ही करायचे नाही ,असे सांगीतले. मरणप्राय वेदनेने बेजार झालेल्या शरदरावांनी ,डाॅक्टरांनी सांगीतलेली पथ्ये मोडायची, म्हणजे आपल्याला मरण येईल व या त्रासातून सुटका होईल, या भावनेने पोहणे आणि सायकलींग सुरू केले. .....आणि आश्चर्य म्हणजे, त्यांचे दुखणे हळूहळू कमी होत गेले .आज शरदरावांना आपले पाय कधी दुखत होते , याची आठवण ही येत नाही. ते अतिशय आनंदी आणि निरामय आयुष्य जगत आहेत.
कारणपरत्वे ते ,विविध विषयावर , कविता ही करतात .परवाच ते नाशिकला आमच्या घरी आले होते. त्या वेळी त्यांनी ,माझ्यावर केलेली कविता मला भेट दिली. आपल्यावर कोणी कविता करते आहे , ही संकल्पनाच मनाला आनंददायी आहे. असा भरभरून आनंद, त्यांनी अनेकांना दिलेला आहे. नुकताच त्यांचा काव्य संग्रह, त्यांच्या पत्नीने आणि मुलींनी प्रकाशित केला आहे.
श्री. शरद उत्तुरकरांना ,त्यांच्या पत्नीची समर्थ साथ आहेच . त्यांना दोन कन्या आहेत. त्या दोघींची लग्ने झाली आहेत व त्या आपापल्या जागी आनंदात आहेत. श्री. शरदरावांचे वास्तव्य मिरजेत असले ,तरी ते मधून मधून आपल्या मुलींच्याकडे जातात. तिथे त्यांच्या मुलींनी ,बाबांच्या साठी सायकल ठेवलेली असते. तिथे ही ते सायकलींग करतातच !
अशा या कविमनाच्या , सदाबहार व आनंदी श्री. शरदराव उत्तुरकरांना व त्यांच्या पत्नीला ,परमेश्वराने उदंड आणि निरामय आयुष्य द्यावे ,ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.