अंधकवि श्री. राम गोसावी , यांचे गेल्या रविवारी दि. १८ आॅगस्ट २०१९ रोजी निधन झाले. निधन समयी त्यांचे वय होते ९२ वर्षे ! ते गेले त्या दिवशी दुपारी बर्या पैकी जेवले. वामकुक्षी साठी झोपले ते झोपेतच गेले. एका मनस्वी कवीला मृत्यूने शांतपणे आपल्या पंखा खाली घेतले !
कै. राम गोसावी , आम्ही त्यांना रामभाउ म्हणत होतो , ते माझ्या मावशीचे मिस्टर ! माझ्या मावशीला मी शकु मावशी म्हणत असे ! आदर्श गृहिणींची यादी करायची ठरवल्यास त्यात शकू मावशीचा अग्रक्रमाने विचार करायलाच पाहिजे.
कै. रामभाउ हे बी. ए. होते .ते सांगलीत शासकीय नोकरीत होते. सांगलीतल्या वास्तव्याच्या काळातले रामभाउ मला चांगले आठवतात. मोठे रसिक होते. कविता तर ते करायचेच पण त्या ही पलीकडे जाउन नाट्य , लोकनाट्य यांचा ही ते मुक्तपणे आस्वाद घ्यायचे ! घरात मात्र त्यांचा माझ्या मावशीवर चांगलाच दरारा असायचा ! असो.
त्यांच्या वयाच्या तेहत्तीस किंवा चौतिस वया पर्यंत त्यांचे डोळे चांगले होते. अचानक Detachment of retina झाल्याने त्यांना अंधत्व आले. त्या काळी त्यांनी उपचार करून घेण्यात कोणतीही कसर सोडली नाही. पण उपयोग झाला नाही. त्यांना अंधत्व आले ते कायमचेच !
...आणि त्या नंतर माझी मावशी , शकू मावशी त्यांचे डोळे आणि काठी झाली. तिने त्यांच्यासाठी खूप खूप खूप केले. ती रोज रामभाउंना हाताला धरून सर्व ठिकाणी घेउन जायची. सभा , सम्मेलने या ठिकाणी ती त्यांना त्यांच्या सांगण्या प्रमाणे नेत असे.रामभाउंना कवितेचे स्फुरण येताच हातातील कामे बाजूला ठेउन शकू मावशी , त्यांच्या साठी वही व पेन घेउन बसत असे. रामभाउंनी माझ्या माहिती नुसार अंदाजे हजारच्या आसपास कविता लिहील्या असतील. दैवाचा दुर्विलास म्हणजे माझी मावशी , २००२ साली अचानक देवाघरी गेली.
त्या नंतर रामभाउ १७ वर्षे होते. बायको गेल्या नंतर पुरूष खचून जातो. पण रामभाउंनी आपण खचून गेलो आहोत , असे कधी ही दर्शवू दिले नाही. ते नेहमी फ्रेश असायचे. कपडे नीट नेटके , रोज दाढी केलेली असायची , केस नैसर्गिक रीत्याच काळे भोर होते. एकूण ते व्यवस्थित असायचे. त्याचे श्रेय त्यांचा मुलगा चि. मुकूंद , सून चि. सौ. मुक्ता आणि मुलगी चि. चित्रा यांना निश्चितच आहे. सर्वजण त्यांची आपापल्या परीने काळजी घ्यायचे. पण प्रत्येकाची कांही " लिमिटेशन्स " असतात ती आपण मान्य केलीच पाहिजेत.
एकूण रामभाउंचे आयुष्य निश्चितच चांगले गेले. काव्य हा त्यांचा विरंगुळा होता. त्यांना एका साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही मिळाले होते. त्यांचे दोन तीन काव्य संग्रह प्रकाशित ही झाले आहेत. त्यांची " डोळे " ही कविता महाराष्ट्र राज्याच्या दाहवीच्या मराठीच्या अभ्यासक्रमात ही समाविष्ट करण्यात आलेली होती. त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचे कांही साहित्यिक पुरस्कार ही मिळालेले आहेत.
एकूण कै. रामभाउंचे जीवन समृध्द असेच होते. आता प्रत्येकाच्या जीवनात कांही चढउतार , टोकाचे मनाला क्लेष देणारे प्रसंग येतच असतात. तसे त्यांच्या ही जीवनात आले असतील. पण या सर्वावर मात करत ते सकारात्मक जीवन जगले ! सकारात्मक जीवन कसे जगावे , याचा ते आदर्श वस्तूपाठच होते !
अशा या चिरतरूण कविच्या आत्म्याला शांती लाभो , ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो !
॥ ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥
कै. राम गोसावी , आम्ही त्यांना रामभाउ म्हणत होतो , ते माझ्या मावशीचे मिस्टर ! माझ्या मावशीला मी शकु मावशी म्हणत असे ! आदर्श गृहिणींची यादी करायची ठरवल्यास त्यात शकू मावशीचा अग्रक्रमाने विचार करायलाच पाहिजे.
कै. रामभाउ हे बी. ए. होते .ते सांगलीत शासकीय नोकरीत होते. सांगलीतल्या वास्तव्याच्या काळातले रामभाउ मला चांगले आठवतात. मोठे रसिक होते. कविता तर ते करायचेच पण त्या ही पलीकडे जाउन नाट्य , लोकनाट्य यांचा ही ते मुक्तपणे आस्वाद घ्यायचे ! घरात मात्र त्यांचा माझ्या मावशीवर चांगलाच दरारा असायचा ! असो.
त्यांच्या वयाच्या तेहत्तीस किंवा चौतिस वया पर्यंत त्यांचे डोळे चांगले होते. अचानक Detachment of retina झाल्याने त्यांना अंधत्व आले. त्या काळी त्यांनी उपचार करून घेण्यात कोणतीही कसर सोडली नाही. पण उपयोग झाला नाही. त्यांना अंधत्व आले ते कायमचेच !
...आणि त्या नंतर माझी मावशी , शकू मावशी त्यांचे डोळे आणि काठी झाली. तिने त्यांच्यासाठी खूप खूप खूप केले. ती रोज रामभाउंना हाताला धरून सर्व ठिकाणी घेउन जायची. सभा , सम्मेलने या ठिकाणी ती त्यांना त्यांच्या सांगण्या प्रमाणे नेत असे.रामभाउंना कवितेचे स्फुरण येताच हातातील कामे बाजूला ठेउन शकू मावशी , त्यांच्या साठी वही व पेन घेउन बसत असे. रामभाउंनी माझ्या माहिती नुसार अंदाजे हजारच्या आसपास कविता लिहील्या असतील. दैवाचा दुर्विलास म्हणजे माझी मावशी , २००२ साली अचानक देवाघरी गेली.
त्या नंतर रामभाउ १७ वर्षे होते. बायको गेल्या नंतर पुरूष खचून जातो. पण रामभाउंनी आपण खचून गेलो आहोत , असे कधी ही दर्शवू दिले नाही. ते नेहमी फ्रेश असायचे. कपडे नीट नेटके , रोज दाढी केलेली असायची , केस नैसर्गिक रीत्याच काळे भोर होते. एकूण ते व्यवस्थित असायचे. त्याचे श्रेय त्यांचा मुलगा चि. मुकूंद , सून चि. सौ. मुक्ता आणि मुलगी चि. चित्रा यांना निश्चितच आहे. सर्वजण त्यांची आपापल्या परीने काळजी घ्यायचे. पण प्रत्येकाची कांही " लिमिटेशन्स " असतात ती आपण मान्य केलीच पाहिजेत.
एकूण रामभाउंचे आयुष्य निश्चितच चांगले गेले. काव्य हा त्यांचा विरंगुळा होता. त्यांना एका साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही मिळाले होते. त्यांचे दोन तीन काव्य संग्रह प्रकाशित ही झाले आहेत. त्यांची " डोळे " ही कविता महाराष्ट्र राज्याच्या दाहवीच्या मराठीच्या अभ्यासक्रमात ही समाविष्ट करण्यात आलेली होती. त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचे कांही साहित्यिक पुरस्कार ही मिळालेले आहेत.
एकूण कै. रामभाउंचे जीवन समृध्द असेच होते. आता प्रत्येकाच्या जीवनात कांही चढउतार , टोकाचे मनाला क्लेष देणारे प्रसंग येतच असतात. तसे त्यांच्या ही जीवनात आले असतील. पण या सर्वावर मात करत ते सकारात्मक जीवन जगले ! सकारात्मक जीवन कसे जगावे , याचा ते आदर्श वस्तूपाठच होते !
अशा या चिरतरूण कविच्या आत्म्याला शांती लाभो , ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो !
॥ ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥